'घरात नवरा मारतोय, बाहेर गेलं तर लोक मारतात; कोट्यवधी घेऊन कंपनीने पलायन केलं'

Maharashtra Times 2022-01-27

Views 7

बीड जिल्ह्यातील मैत्रेय घोटाळ्यातील पीडितांना जगणं असह्य झालंय. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात कोट्यवधींची माया जमवली आणि मैत्रेय प्रायवेट लिमिटेड ही कंपनी पसार झाली. जास्ती व्याजदराचं आमिष दाखवून या कंपनीने ४० ते ४५ हजार नागरिकांकडून पैसे जमा केले. हा आकडा थोडाथिडका नव्हे तर जवळपास ४० कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. पण यापेक्षा वेदनादायी गोष्ट म्हणजे आरोपपत्रात फक्त चार कोटींचा आकडा दाखवण्यात आलाय. पीडितांपैकी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, तर अनेकजण आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र निर्माण झालंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS