"वीज मंडळाची सध्या ६७ हजार कोटींची थकबाकी आहे. जिथून राज्याला वीज मिळते ती व्यवस्था टिकवणं महत्वाचं आहे. सध्या करण्यात आलेली वीज दरवाढ सामान्यांसाठी त्रासदायक आहे. सरकार वाढीव वीज बिलाबाबतच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहे. पण मागील सरकारने काम नीट केलं असतं, तर ही वेळ आली नसती", असं मत राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.