Ratnagiri : कोकणात सुरू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचा वाद आणखी चिघळलाय. काल दुपारी ३ वाजल्यापासून रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात स्थानिक गावकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेकडो महिला, पुरुण, तरुण आणि वृद्ध आंदोलनात उतरी आहेत.. मातीचे परीक्षण करण्यासाठी काही अधिकारी काल त्या ठिकाणी गेले होते. मात्र या स्थानिक नागरिकांनी सर्व्हेला विरोधात करत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.