डॉ आंबेडकर स्वाधार योजनेबाबत कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन | Nanded | Maharashtra | Sakal |

Sakal 2021-04-28

Views 241

नांदेड : मागील दोन वर्षांपासून भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही मिळत नाही. भारत सरकार शिष्यवृत्तीचा उद्देश अनुसूचित जाती-जमाती व इतर भटक्या विमुक्त जातींच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित संवर्धन करण्यासाठीच आहे. पण आज हा हेतु पूर्ण होताना दिसून येत नाही. शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते.पण शैक्षणिक वर्षात पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यासाठी नॅशनल एससी, एसटी, ओबीसी, स्टुडन्ट अँड युथ फ्रंटने भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम त्वरित जमा करण्यासाठी समाजकल्याण कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.२५) आंदोलन केले.
(व्हिडिओ ः करणसिंह बैस)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS