घरचा कर्ता पुरुष गेल्याने जगायचे कसे? I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 183

राजुरा (जि. चंद्रपूर) : मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने दहा शेतकरी शेतमजूर यांचा बळी घेतला. यामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. घरचा आधार हरवल्यामुळे जगायचे कसे हा मोठा प्रश्न कुटुंबातील सदस्यांसमोर आहे. वाघाच्या दहशतीत शेतीवर जाणे बंद आहे. रोजीरोटी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आधार गेल्याने पीडित कुटुंबीयांसमोर आर्थिक संकट उभे आहे. घरचा आधार गेल्यावर शासनाच्या निधीचा काय उपयोग? अशा उद्विग्न भावना पीडित कुटुंबातील विधवा महिलेने व्यक्त केल्या. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील वारसदारांना शासनाने नोकरी द्यावी, अशी मागणी शेतकरी शेतमजूर समन्वय समितीचे प्रमुख चेतन जयपूरकर यांनी केली आहे.
(व्हिडिओ : आनंद चलाख-मनोज आत्राम)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS