विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाण्यावरील धोरण जाहीर केले वंचितची सत्ता आल्यास महाराष्ट्रातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले सोबतच, वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर पडला आघाडी आणि मित्र पक्षांवर बोलताना, आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत ज्यांनी दार बंद केले त्यांनी सुरुवात करावी पुन्हा चर्चा होऊ शकते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत