'६०% आपल्या महिला मतदानाला जात नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही मुस्लिम महिला व्हाल.आपलं राहणीमान आणि मुस्लिमांच राहणीमान यात जमीन-आसमानाचा फरक आहे. देशात १४०करोड जनता आहे, त्यामध्ये ९४ करोड हिंदू आहे,तर ४६ करोड हे मुस्लिम आहेत. त्यामुळे येणाऱ्या दहा वर्षात त्यांचा पंतप्रधान होईल आणि महिलांना बुरख्यात राहावं लागेल' असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेच आयोजन करण्यात आलं होत त्यावेळी ते बोलत होते.