#CoronaVaccine #AdministrativeOfficer #Vaccination #MaharashtraTimes
अहमदनगर जिल्ह्यात अनेक नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अनेकांनी पहिला डोसही घेतला नसल्याने आता प्रशासनाने हर घर दस्तक हि मोहीम जिल्हाभर सुरू केली आहे. त्याअनुषंगाने कोपरगाव तालुका प्रशासनाने तर थेट आठवडे बाजारात जावून लस न घेतलेल्या नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे जागेवरच लसीकरण केले आहे.