एकशे पंचवीस वर्षांचा कळंबा तलाव पाचगाव ची तहान पाठव भागवण्या पाठोपाठ वर्षा पर्यटनाची हौस पण पूर्ण करत आहे. तलावाची पाणी पातळी क्षमतेपेक्षा अधिक झाल्यास सांडव्यावरून पाणी वाहते. सहा फुटी दगडी भिंती च्या सांडव्यावरून एखाद्या धबधब्या प्रमाणे पाणी वाहू लागले की हे दृश्य पाहण्यासारखे असते. या पाण्यात चिंब भिजण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून वर्षापर्यंटनासाठी अनेक करवीरवासिय सहकुटुंब येतात.परंतु सध्या हा सांडवा अतिशय दुरावस्थेत आहे. याचे जुना दगड कोसळले आहे त ओढ्याचा प्रवाह बांधकाम करून घेतला आणि कठडे केले तर नागरिकांना सुरक्षित राहून पाण्याचा आनंद घेता येईल. कळंबा सांडवा पर्यटन केंद्र व्हावे यासाठी कळंबा चे सरपंच सागर भोगम आणि पाचगाव चे संग्राम पाटील यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कडे आग्रह धरला आहे.
व्हिडीओ स्टोरी - मोहन मेस्त्री
निवेदन - सुयोग घाटगे