कवयित्री विमल लिमये यांची 'घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,' ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका 'ललित २०५' स्टार प्रवाह घेऊन येत आहे. उत्तम स्टारकास्ट असलेली ही मालिका ६ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.