सध्या राज्यभरात मराठा समाजाकडून काढण्यात येत असलेल्या मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपची आगामी रणनीती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपमधील वरिष्ठ मराठा नेत्यांना वर्षा बंगल्यावर पाचारण केले आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि मराठा नेत्यांमध्ये मराठा समाजासंदर्भातील परिस्थिती कशाप्रकारे हाताळायची याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.