चाय पे चर्चा’ला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेला ‘खाट सभा’ कार्यक्रम मंगळवारी वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देवरियापासून २५०० किलोमीटरच्या किसान यात्रेला सुरुवात केली. याच यात्रेदरम्यान रुद्रपूरमध्ये त्यांची ‘खाट सभा’ झाल्यानंतर लोकांनी कार्यक्रम संपल्यावर थेट खाटा घरी नेण्यासच सुरुवात केली. काहींनी डोक्यावरून तर काहींनी खाटांचे पाय तोडून त्या घरी नेल्या.